Friday, October 20, 2006

तो पुन्हा एकदा आला होता

तो पुन्हा एकदा आला होता
माझ्या विश्वासाला तडा द्यायला
पटलं होतं मला
मी केव्हाच विसरलंय त्याला
आणि शिकलेही होते मी
दु:ख लपवून हसायला
तो पुन्हा एकदा आला होता
हसणं आणि खुलण्यातला
फरक समजावयला.



भावनांचे सारे दरवाजे मी
बंद केले होते
ओठांनाही मोठे कुलुप लावले होते
तो पुन्हा एकदा आला होता
ते सारे दरवाजे उघडायला
नाहीच उघडले,
तरी थोड्या चिरा पाडायला.



त्याचे-माझे मित्र-मैत्रिणी
केव्हाच दूर गेले होते
अनोळखी लोकांशी नवीन
बंध जोडले होते
तो पुन्हा एकदा आला होता
जुन्या आठवणी काढायला
कोण आता कुठे असतो
हे मलाच विचारायला.

पण तो आला आणि कळलं
की काय हरवलं होतं
कितीही बांधलं तरी
मन तुझ्यामागेच धावत होतं
खूप बोलून घेतलंय, खूप हसून घेतलंय
सारे दरवाजे मोकळे करून
घर प्रकाशाने भरून घेतलंय.

तो आता निघून गेलाय
माझ्यासाठी मोठ्ठं काम सोडून
पुन्हा बांध बांधायचेत
आणि पुन्हा ओठ कसायचेत
मनाला समजून सांगायचंय
पटेपर्य़ंत बोलत राहायचंय
की मी त्याला विसरलेय
मी पुन्हा एकदा
त्याच्यावाचून जगायला शिकतेय.

-विद्या.

Wednesday, October 18, 2006

तुझ्या आठवणी

तुझ्या आठवणी येतात
श्रावणातील सरींप्रमाणे,
फुलवून जातात माझ्या मनाला
कणाकणाने.......

-विद्या.

Thursday, October 12, 2006

ऊन-पावसाचा खेळ

रात्री शाळेत जायच्या चिंतेने झोपी जावं आणि सकाळी पऱ्याच्या राज्यात जागं व्हावं तसं वाटत होतं. सकाळी ९ वाजता(हो, कुणी उठवायला नसेल तर अजून उशीरा :-) ) मैत्रीणीचा फोन आला 'अगं बाहेर बघ Snow fall होतोय'. मी अविश्वासाने धडपडत उठले आणि पडदा उघडून पाहीले तर खरंच पांढरे कापसाचे कण भुरभुरत जमिनीवर येत होते. :-) It made my day ! ओक्टोबर मध्ये हिमवर्षाव? अवेळीच होता तो. कारण साधारणपणे नोव्हेंबरच्या शेवटच्या दिवसांमध्ये कधीतरी पडणारा हा पाऊस एक महीना आधीच आला होता.असो. मी घाईघाईने आवरू लागले. १५-२० मिनीटानी मी पुन्हा एकदा बाहेर पाहीलं. गवतावर सफेद चादर पसरली होती. मी आनंदाने पाहत राहीले. आणि तेव्हाच, तेव्हाच कोवळ्या उन्हाची एक तिरीप माझ्य़ा बाल्कनीत दिसली. :-)) हिमकणांच्या त्या चादरीवर कोवळे ऊन फारच सुरेख दिसत होते. मी पटकन एक फोटो काढला.
ओफिसमधे जाणे गरजेचे होते. बाहेरच्या उन्हामुळे मलाही गाडी बाहेर काढायचा हुरूप आला. आवरून बाहेर पडले आणि वाटले रोज तळपणारा सूर्य थंडीत किती असहाय्य, असमर्थ वाटतो. गाडीवरचे बर्फ काढण्यासाठी काहीच नव्हते. मग कसातरी हातानेच तो बाजूला सारला. हिमवर्षाव थांबला होता आणि ऊन बिचारे बाकीच्या गाड्य़ांवरचा, गवतावरचा, रस्त्यावरचा बर्फ वितळवण्याचा प्रयत्न करत होते. मी गाडी काढली. एक-दोन सिग्नल आरामात गेले. अचानक ऊन गायब झाले होते. हिमकण जोरजोरात गाडीच्या काचेवर येऊ लागले. एकदम दूरचे दिसणे बंद झाले. पुढची पाच मिनीटे मी अंदाजेच जात होते. ३-४ सिग्नल गेले आणि परत ऊन पडले होते. हा खेळ अजून किती वेळ चालणार होता ऊन-पावसालाच माहीत. मी मात्र त्यांना पाहण्याचा आपला मूड आवरत ओफिसमध्ये पळत गेले. दिवसभर त्या दोघानी काय गोंधळ घातला तेही मला माहीत नाही. पण मी त्यांचा फायदा घेत, लवकर घरी निघून आले. :-)
(वरच्या चित्रात माझ्या बाल्कनीमधून काढलेला एक फोटॊ. गवतावरच्या बर्फावर पडलेले कोवळे ऊन ! )
-विद्या.

Wednesday, October 11, 2006

माझी चित्रकला- कला?

गेल्या ४-५ दिवसांपासून हे चित्र पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होते. आणि आज ते झालंय. :-) तसं पाहीलं तर बर्यापैकी जमलंय पण त्या पुस्तकात होतं तसं नाही. ते पहाताना माझ्या मनात विचार आला, 'मी चित्र काढलं म्हणजे काय तर पुस्तकात होतं ते पाहून माझ्या वहीत उतरवलं. याला कला म्हणता येईल का?' उत्तर होतं 'नाही'. ज्या माणसाने हे मूळ चित्र काढलं त्याला कला म्हणतात.मी एकदा प्रवास करत असताना माझ्या शेजारी एक माणूस बसला होता. तो जागेवर बसल्यावर ५ मिनीटात त्याने आपली वही काढली आणि काहीतरी रेखाटू लागला. त्याच्या हातात 'कला' होती. केवळ कल्पनेने/ आजूबाजूला पाहून काढलेली ती रेखाटने खूपच सुंदर होती.
मी काही पुस्तकेही आणली ज्यामध्ये काही टिप्स दिल्या आहेत, चेहरा काढण्यासाठी, स्थिरचित्रे काढण्यासाठी, इ. पण शेवटी ते पण नक्कल करणेच झाले ना? कधी विचार करायला लागले की फार नाराजी येते.मला माहीतेय की मी आता तरी अशी(काल्पनिक) चित्रे नाही काढू शकत, क. नुसते पुस्तकात पाहून तरी कितीदा काढणार?मला कळत नाहीये की मग करायचे तरी काय?
-विद्या.

Friday, October 06, 2006

तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही.....

Do I live in the past? Yeah, most of the times. Many people told me that :-) and I agreed. I decided to be in the present. Live the life as it comes and believe me I have been following it up for last few years. In last 2 years, I have moved to so many different places and lived with people I have hardly known. It was good. Visiting different places and enjoying the specialities of each of them. I had fun. Even now I am in here with bunch of people, I know for last 2 months. Its nice here. Its fun to be neighbour to someone, share the dishes, recipes and sometimes when you forget to buy salt, just knock the next door for a pinch of it. :-) Everything seems so fine.So what's exactly wrong? Thats what I was trying to think.
Every time I left one group of friends, I made bunch of others at new place. And they were all dear to me. There are friends with whom I have spent years and each day of those years. If we did not meet each other for a day, there used to be much to share. I remember when after each exam in college, we used to enjoy the vacation at home.But the phone bills used to be definitely more that month. And also remember the excitement of meeting each other after so many days. I miss that. I miss being so close to someone and sharing every small thing that happens in the day. I feel that those are the friends/people who know me, how I was and How I am.
When I see myself talking now a days, I feel its fake. Its all shallow. When I talk anyone, I ask 'How's life?'. And if anyone asks me that I say ' I am good'. Short and simple.That is why while listening to this song I realised...
तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही!
I havent met my old friends for years and may not have written a mail or called. I want to tell all those my friends that I miss them, I miss being with them and I miss laughing,enjoying,hanging out with them.I want to tell all of them that....
तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही.....
तेरे बिना जिंदगी भी लेकिन जिंदगी तो नही.....जिंदगी नही......
-Vidya.