Wednesday, October 24, 2007

मन वढाय वढाय...

ब्लॉग आणि तोही भर दुपारी ऑफिसमधे :-) बऱ्याच दिवसांनी अशी संधी मिळालीय. :-)) अर्थात त्याआधी मेल लिहिणे, चेक करणे, हा पेपर ,तो पेपर सगळं उघडून झालं.म्हटलं चला जरासं लिहूनही बघावं. खरंतर मी विचार करत होते की आता लिहीन....तर ते घरी गेल्यावरंच....पण त्याआधीच संधी मिळाली. तर त्याचं असं झालं.....एकाच कंटाळवाण्य़ा प्रोजेक्टवर काम करून मी बरीच कंटाळले. मधे मेघनाने एका पोस्ट मध्ये लिहिलं होतं तसं पळून जाण्यात काय मजा आहे, स्वत:ला प्रूव करूनच जायचं असा अट्टाहासही केला. आणि खरंच एकेका दिव्यातून पार पडत एक प्रोजेक्ट पूर्ण केलाही. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत, वेळ आल्यास कुठलीही गोष्ट स्वत: अभ्यास करूनही पूर्ण करण्याचा आत्मविश्वास तर मिळालाच पण न कंटाळता काहीतरी क्रिएटिव्ह केल्याचा आनंदही.
त्यात १०० वेळा 'Are you there?' असं विचारल्यावर एकदाच उत्तर देणारा , बग आहे हे माहीत असूनही तॊ शेवटपर्यंत न कळवणारा, आणि शेवटी त्याला सांगण्य़ापेक्षा स्वत:च मेलेलं बरं असा वाटणारा भारतातील एक टीममेंबर. कितीही वेळा प्रोजेक्टचं स्टेट्स सांगितल्यानंतरही मग याचं काय आणि त्याचं काय असं विचारून पिडणारां मॅनेजर, आणि सगळ्य़ा कटकटीतून बाहेर पडलेतर मग Time Sheet Defaulter म्हणून आलेला एखादा फालतू मेल...अशा सगळ्या दिव्यातुन पार पडत शेवटी काल डेमो पण पूर्ण झाला आणि आता जरा कुठे हुश्श होतंय असं वाटलं.
हे सगळं होतं असतानाच एक गोष्ट जाणवली होती. एव्हढी मरमर करूनही मिळावी तितकी शाबासकी नाहीच...आणि ती कधी मिळणारही नाही हे कळलं तेव्हाच यातून बाहेर पडायचा निर्णय घेतला. तसं बरंच अवघड वाटत होतं, दोन वर्ष अगदी घर ,रोजचा येण्याजाण्याचा रस्ता काय, काहीच बदलावं लागलं नाही. अशा स्थिरतेकडून अस्थिरतेकडे जायला मन धजावत नव्हतं. पण प्रत्येक वेळी एक असा क्षण येतो ना तेव्हा वाटतं की बस्स...खूप झालं आता. सुदैवाने म्हणा तसा क्षण लवकरच आला आणि मग पावलं हळूहळू त्या मार्गाने वळू लागली. आता हो-नाही करत माझी रीलीज पक्की झाली, लवकरच माझ्या जागी येणाऱ्या माणसाची पण आयात झाली. मग काय, त्याला फक्त काय काय केलंय ते सांगायचं आणि सुटायचं. त्यातही १०-१२ documents वाचायला दिले की आपली अजून थोडी सुटका. गेले दीडेक आठवडा तेच करत आहे. :-) एक-दोन तास बडबड करायची, काही documents लिहून ठेवायची,इ.इ.
खरं सांगायचं तर त्यातही मी जाणार म्हटल्यावर असं वाटलं की मी अचानक विरुद्ध गटात आलीय आणि माझ्यासोबत मॅनेजरबद्द्ल गॉसिपिंग करणारी मुलगी, मी काही issues अर्धवट तर टाकत नाही ना हे बघण्यासाठी एकदम दुसऱ्या गटात गेली. लोक कसे फिरतात ना? असो. इतके दिवस प्रोजेक्टवर काम केल्यावर सगळं दुसऱ्याच्या हातात देणंही अवघड जात होतं. वाटलं ही गोष्ट करताना आपल्याला किती कष्ट पडले होते, ती केली तेव्हा कसे प्रोब्लेम आले होते. :-) हे सगळं सोडून देणं जितकं सोप्पं वाटलं होतं तितकं नाहीये हे ही जाणवलं. असो, या सगळ्य़ांपेक्षा आता फक्त १५-२० दिवस राहिलेत घरी जाण्यासाठी हेच महत्वाचं वाटतंय आणि बाकी सगळं फालतू वाटत आहे. कुणाचं आपल्यावाचून अडणार आहे? आता घरी जाऊन हे करणार, ते करणार, अशी दिवास्वप्नं बघत आहे. :-) कधी कधी तर मी १५-२० दिवसांत घरी असेन या कल्पनेनंच काही काम सुचत नाही. असो... इतके दिवस सरले..हेही सरतील.... :-))

आता मात्र लिहीन ते.....घरी गेल्यावरच........

-विद्या.

6 comments:

Meghana Bhuskute said...

zakaas! yaa lavakar!

Meghana Bhuskute said...

zakaas! yaa lavakar!

स्नेहल said...

:) asa hot khar...

Congratulations for release!!! Ani lavkar ghari jaun patapat blog lihayala laag :)

tAutomation said...

yogya shabat Release Vishayi bhavan vyakta kelya ahet...Well Said...
AV
http://mianimazatv.blogspot.com/

Unknown said...

I really liked ur post, thanks for sharing. Keep writing. I discovered a good site for bloggers check out this www.blogadda.com, you can submit your blog there, you can get more auidence.

Monsieur K said...

yanda Diwali ghari ka mhanje??
sahi jawaab :)
have fun n keep writing!