परवा तू भेटलास आणि वाटलं
सुकलेली फुलं, अलगद तळहातावर ठेवून,
दोन बोटांनी चुरगळली गेलीत
आणि थोडा-फार उरलेला सुवासही उडून गेला.
बरं झालं भेटलास ते,
आता तो चुरा,
फुंकर मारून उडवता येईल
असेही डायरीमधे नवी फुले ठेवायला
जागाच उरली नव्हती.
-विद्या.
Monday, March 03, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
...
सुंदर. एकदम भिडली.
Post a Comment