Tuesday, May 21, 2019

बहर

प्रिय तुला,
       बहराच्या याच काळात तर गावातून बसने, ट्रेन मधून फिरताना या फुलांकडे पाहात भरभरुन पत्रं लिहिली होती. दिवस सरतील तसा संवादही कमी होत जातो. आणि त्यातला उत्साहही. पण ही फुलं मात्रं नव्यानं गळून तितक्याच उत्साहानं दरवर्षी भरभरुन येतात. अख्खा गाव सजवतात.
आपण मात्रं त्याच त्या जुन्या खपल्या आयुष्यभर वागवत राहतो. माणसालाही हे असं, जुन्या खपल्या गळून नव्यानं बहरता यायला हवं, नाही का? पुन्हा हा बहरही ओसरेल हे माहित असूनही....

विद्या भुतकर.

No comments: