Tuesday, September 25, 2007

एक बरस बीत गया...

काहीतरी लिहायचं म्हणून......
आता सगळ्य़ा Annevarsaries साजरी करण्याची सवयच झालीय. दिल चाहता है मध्ये नाही का तो एक नमुना आहे सोनाली बेंद्रेबरोबर. "यहां हम इस तारीख को,इतने बजे मिले थे...". तसं, जरा काही झालं की Annevarsary करा साजरी. पण तीही करण्यात जरा उशीरच झाला. मग काय? Belated Celebrations? Belated Wishes? I hate to do that. मला एक कळत नाही एखाद्याला दोन दिवसांनंतर 'हॅप्पी बर्थडे' असं म्हणून काय उपयोग? साजरा करण्याचा दिवस तर निघून गेलाय आणि नंतर तुम्ही त्याला शुभेच्छा दिल्यावर त्या माणसाने काय करावं?
असो, उशीरा का होईना याबद्दल मला काही तरी लिहायचंच होतं. कशाबद्दल? माझ्या ब्लॉग लिहिण्याला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल. :-) २० सप्टेंबरला,एक वर्षापूर्वी मी पहिला पोस्ट लिहिला. तेव्हा मी इतकी उत्साहात होते तरीही मला कमीत कमी दोन तास लागले असतील काही ओळी पूर्ण करायला. पण मी तेव्हा इतकी खूष होते की मला मराठीमध्ये काहीतरी लिहायला मिळेल. त्याचबरोबर मला बाकी लोकांचे ब्लॉग बघूनही इतकं आश्चर्य वाटत होतं. कसं लिहीत असतील हे लोकं एव्ह्ढं सगळं, तेही इतक्या छान भाषेत आणि इतक्या नियमितपणे. तशी थोडी भीतीही वाटली होती की आपल्याला कुठे लिहायला जमेल असं. पण माझ्या उत्साहापुढे बाकी सगळ्या गोष्टी फिक्या होत्या.
पहिले दोन-चार ब्लॉग लिहिले आणि मला एक गोष्ट जाणवली. मला जो काही मराठीचा अभिमान होता तो अगदी ढासळत होता. मला मराठीमध्ये विचारच करता येत नव्ह्ता. मला एक कळलं होतं, कित्येक वर्षात माझ्या मराठी बोलण्यात विशेष फरक पडला नसला तरी माझी विचार करण्याची प्रोसेस(परत इंग्लिश) इंग्लिश मधूनच होत होती. म्हणजे मला इंग्रजीमध्ये विचार करून त्याचं मराठीत भाषांतर करायला लागत होतं. मग त्यातही मराठी शब्द आठवण्याची मारामारी. मग बाकीचे ब्लॉग वाचताना हळूहळू 'याददाश्त वापस आ रही है' असं झालं. :-)
मी मराठीमध्ये विचार करायला लागले, काही लिहायची इच्छा होत असताना शब्द जरा वेगात डोक्यात येऊ लागले.पण अजून एक गोष्ट होती. विचार करताना मला असं वाटायचं की मला हे लिहायचंय, असं म्हणायचंय. प्रत्यक्षात लिहायला घेतल्यावर मात्र काय आणि कसं लिहायचंय हे कळायचं नाही किंवा लिहिल्यावर वाटायचं की अरे मला असं म्हणायचं नव्हतं, इ.इ. आता सवयीने हेही कळलंय की प्रत्यक्षात शब्दात मांडताना बरेचसे विचार स्पष्ट व्हायला लागतात आणि डोक्यातले गोंधळही जरा कमी होतात. बाकी माझ्या लिखाणातून हे संदर्भ निघतील ते वेगळेच.
दुसरी गोष्ट म्हणजे, नियमितपणा. सुरुवातीचे काही दिवस मी रोजच विचार करायचे काय लिहायचं त्याबद्दल. तेव्हा अर्थात इतक्या वर्षाचं साठलेलं देखील होतं जे लिहायचं होतं, नंतर त्यातला उत्साह कमी झाला. मला वाटलं आता माझ्या आळसामुळे ही गोष्टही अशीच अर्धवट राहील की काय. पण प्रत्येक महिन्यात २-४ का होईना पोस्ट लिहिले गेले आणि आज मला बरं वाटतंय की, गेल्या दोनेक महिन्यांना वगळता बऱ्यापैकी नियमितपणे लिहिलं गेलं. आणि आता जरासं लिखाणाच्या विषयांबद्दलही. सुरुवातीला मला असं वाटलं होतं की मला प्रत्येक गोष्टीवर,सभोवतालाच्या घडणाऱ्या घटनांवर माझं असं मत असेल जे मला मांडायचंय. आता मला कळलंय की मला खास अशी काही वेगळी मत नाहीयेत मांडण्यासाठी. :-)) तरीही असाच एकदा डोक्यात विचार आला आणि एक लघुकथा(?)लिहिली आणि मग लिहीतच गेले, त्यात तथ्यं असो वा नसो. जरा बरं वाटलं काहीतरी वेगळं करायला लागल्यावर. थोड्या दिवसांत तेही कमी झालं कारण मी दुसऱ्याच व्यक्तीच्या दॄष्टीकोणातून हे सर्व बघतेय असं वाटलं. माझं 'मी' पण हरवलंय असं वाटलं. (अजून ते सापडलं नाहीये हे खरं, शोध चालू आहे.) आधी खूप काही लिहिण्यासाठी धावणाऱ्या मला,'माझिया मना जरा थांब ना' असं म्हणावं लागत होतं, ते 'माझिया मना जरा धाव ना' असं म्हणायची वेळ आली. सर्वात वाईट मला कविता न करता येण्याचं वाटलं. जुन्या कविता वाचताना ती जुनी मी आता कुठेतरी हरवून गेलेय असं वाटलं. तो विचार करण्य़ातला हळवेपणा, नात्यांतला नाजूकपणा सर्व नाहीसे झालेत असं वाटलं. आणि दु:खं याचं की ते हरवत असताना मला कळलं देखील नाही. अचानक चार वर्षांनी ते जाणवून काही उपयोगही नाही. :-(( असो.
ब्लॉगमुळे अनेक लोक भेटले आणि आवडलेही. त्यांच्या लिखाणातून हरवलेले संदर्भही मिळाले. तसंच,लिहून झाल्यावर प्रतिकियांची उत्सुकताही. Something to look forward to....माझ्या नेहमीच्या चार चौकटीतल्या आयुष्यापेक्षा काहीतरी वेगळं मिळाल्याचा आनंद आणि कित्येक वर्षात जे केलं नाही ते केल्याचं समाधान. हे सर्व माझ्यातले बदल मला लिहायचेच होते,म्हणून या पोस्टचा प्रपंच.....माहीत नाही की अजून किती दिवस हे सुरळीतपणे चालू शकेल पण 'एक बरस बीत गया'. असंच चालू रहावं म्हणून मी प्रयत्न नक्की करणार आहे. बघू कितपत जमतंय ते.
-विद्या.

13 comments:

Shashank Kanade said...

मुह की बात छीन ली आपने तो!
keep writing :)

Parag said...

wa.. varshapurti baddal shubheccha.. !
Keep writing.. :)

स्वाती आंबोळे said...

हमको ग़ालिबने ये दुआ दी थी
'तुम सलामत रहो हज़ार बरस'
ये बरस तो फक़त दिनोंमें गया...

- ग़ुलज़ार (who else?) :)

स्वाती आंबोळे said...

By the way, Happy Anniversary! :)

Mints! said...

chaan :) lihit rahaa ....

कोहम said...

tuzza blog mazya blog pekssha chaar varshanni "vadeel" aahe....keep writing...we are waiting for more....

Yogesh said...

haardik shubhechchha. :) lihit raha :)

Nandan said...

abhinandan, vidya. pudheel lekhanasathi hardik shubhechchhaa. lihit raha.

Meghana Bhuskute said...

लिहीत राहा. मनापासून शुभेच्छा. :)

abhijit said...

दिल चाहता है मध्ये सोनाली कुलकर्णी असते. ते जाऊदे. पण लेख मात्र अप्रतिम लिहिलात. आता याहून वेगळं काय लिहायच. मला २ वर्षे पूर्ण होतील तेव्हा मी या तुमच्या लेखाची लिंक देईन.

Tulip said...

chhan lihil ahes vidya.

keep writing. tula shubhechha!!

Monsieur K said...

Vidya,

Belated wishes on completing one year of blogging :)
yeah, i know i am almost 8 days late in my wishes :D
but hope u keep writing for many more days n years to come :)

All the best!
~Ketan

Nandan said...

hi vidya, tula tag kelay je je uttam madhe. Naveen varshatala pahila lekh :)